पुन्हा असा प्रसंग नको तर एवढं कराच,
...तर यासाठीही प्रभुच कारणीभूत ठरले असते!
अरे ज्यांनी एका ट्वीट वर तान्हुल्याला धावत्या ट्रेनमध्ये दुधाची बाटली उपलब्ध करून दिली. माझ्या एक व्हॉटसऍप मेसेजवर सिंधुदुर्गातील सामाजिक कार्यकर्त्याच्या अंतिम संस्कारासाठी ट्रेन थांबविली आणि त्यांचे ते विधी लवकर पार पाडले. अशा या आणि अनेक घटना सुरेश प्रभू यांच्या जनताभिमुख कार्याची पोच पावती आहे. (मी काही प्रभू किंवा सरकारचा चाहता नाही, पण चांगल्याचं कौतुकसार आणि वाईटावर प्रहार केल्याशिवाय राहत नाही. )एवढचं नाहीतर रेल्वेचा विकास आणि रेल्वेची गती वाढविण्याचे कार्य जेवढं प्रभुनी केलं, तेवढं आजतागायतच्या रेल्वे मंत्र्यांनी ते करायचं सोडाच, त्याचा विचार देखील केला नसेल. तरीही प्रभू रेल्वेच्या विविध अपघातांना जबाबदार कसे? पण तसे असेल तर मग आजच्या परळ एल्फिस्टन जोडणाऱ्या रेल्वेच्या पादचारी पुलावरील मृत्यूच्या तांडवाला पियुष गोयलच जबाबदार आहेत. कारण रेल्वेच्या कोणत्याच कामात शिस्त दिसत नाही. या पुलाचा प्रश्न आता उद्भवलेला नाही तर तो बरीच वर्षे रेंगाळलेला आहे, जसे परळ टर्मिनस, असो! रेल्वेच्या पुलाबद्दल बोलायलाच नको, कारण परळच्या बाजूने या पुलावर दोन जीने आहेत, ज्यात मोठा जिना म्हणजे एकावेळी फक्त तीन-तीन माणसे एका एका पायरीवरून चढू शकतील किंवा उतरू शकतील. तर त्याच्याच बाजूला छोटा अरुंद जिन्यातून फक्त एकच माणूस वर चढू शकेल, जर दुसरा माणूस उतरत किंवा चढत असेल तर धक्काबुक्की ठरलेलीच. असे काहीसे रेल्वे पूल म्हणजे दादार सेंट्रलचे क्रमांक एक आणि दोन फलाट. तर कुर्ल्याचे सगळेच पूल अरुंद आणि केव्हाही अपघात होतील असे. प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी हार्बर लाईनला चुनाभट्टीच्या दिशेने एक ब्रिज बांधला त्या जिन्याचा भाग एवढा अरुंद आहे की फक्त एकावेळी दोघेजण चढतील आणि ट्रेन आली कि महिला आणि पुरुष यांची धक्काबुक्की सुरु होतेच. तसेच माटुंगा सेंट्रलसह मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशन आणि विशेष म्हणजे लोकलसोबतच मेल एक्सप्रेस धावणाऱ्या ठाणे आणि पनवेल स्टेशनवरील ब्रिजची अवस्था अत्यंत वाईट अशीच. त्यातल्या त्यात नवी मुंबईची हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर सिडकोची मेहरबानी. नाहीतर रेल्वेचे सगळे ब्रिज आणि रेल्वे अधिकारी मोठ्या दुर्घटनेची वाटच बघत आहेत की काय अशी परिस्थिती आहे. कारण अधिकारी कर्मचारी बाजूला पुढे येतात ते मंत्री, असो। हा एक भाग झाला.
पण एका अर्थाने या दुर्घटनेकडे जर डोळसपणे पाहिलं तर असं लक्षात येईल की, आपण सगळी माणसं तरीही जो तो स्वतःच जीव वाचविण्यासाठी पळत होता. आणि पाळताना त्याने दुसऱ्या माणसांचा आणि त्यांच्या जीवाचा विचार केला नाही. त्यामुळे या दुर्घटने मागचं प्रार्थमिक कारण म्हणजे स्वार्थी वृत्ती आणि दुसरा कुणीही आहे याचा विचारच ना करणे, मी आणि फक्त मी. नाहीतर कितीही माणसं या ब्रिजवर आली असती तरीही प्रत्येकाचा विचार प्रत्येकाने केला असता तर सगळे वाचले असते कुणाला खरचटलं किंवा धक्काही लागला नसता. हा उपदेश करणं सोप्पं आहे राव, पण हे करणार कोण? असं विचारून चालणार नाही जर आपण परिस्थितीनुसार वागलो नाही तर असेच होत राहणार. कारण आजही आपण छोट्या छोट्या गोष्टी, नियम, कायदे आणि अगदीच काय सुरक्षिततेचे उपायही मोडीत काढतो. म्हणजे बघा ना ट्रेन मध्ये चढताना, उतरताना. सीट मिळविताना. अगदीच उभं राहताना देखील धक्काहा देतोच. रेल्वे स्टेशन आणि रेल्वेत कचरा टाकणे, थुंकणे, सीटवर पाय पसरून बसने, विंडो सीट मिळाली तर खिडकीतून पिचकारी मारणे, दरवाज्यात राहून दरवाज्याच्या मागील बाजूस थुंकणे असे अनेक प्रकार सुरू असतात. त्यामुळे यापुढे काही नियम स्वतः पाळायला हवेत आणि दुसऱ्यांकडून पाळून घ्यायला हवेत. कोणत्या परिस्थिती कसं वागलं पाहिजे हे शिकलं पाहिजे आणि शिकवलं पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात मुल्य शिक्षणाबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत कोणती जबाबदारी पार पाडावी हे शिक्षण अति महत्वाचं आहे. तेव्हाच अशी संकटकाळी मदत करणारे अनेक हात निर्माण होतील. त्यासाठी कोणत्या मदत पथकाची गरज नसेल किंबहुना आजची घटना पुन्हा घडणारच नाही.
पण एवढंच करून आपली जबाबदारी संपत नाही. आपण कुणावर अन्याय करणार नाही आणि आपल्यावर अन्याय झाला तर त्या विरुद्ध बोलायला हवे, रेल्वेची काम झाली नाहीत तर त्यांना जाब विचारायला हवा. निवडणुकीत मतदान नाही तर मताचा अधिकार वापरायला हवा. लोक प्रतिनिधीला त्याच्या कर्त्यव्याची जाणीव करून द्यायला हवी. पोलीस, अधिकारी, सरकार आणि कुणीही व्यक्ती नियम तोडत असेल तर ते थांबवायला हवं, आवाज उठवायला हवा. असं केलं तरच चांगली कामे होतील, अरुंद रस्ते , ब्रिज आणि गैरसोयीचे कोणतेच काम होणार नाही. जे होईल ते समाज हिताचे, त्यामुळे स्वार्थी वृत्ती सोडा आणि दुसऱ्यांचा विचार करा. तरच दुसरं तुमचा विचार करतील. पण असे असले तरी अशा दुर्घटनांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जबाबदार असलेले अधिकारी, कर्मचारी, व्यक्ती शोधा आणि त्यांना शिक्षा करायला सरकारला भाग पाडा. रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारून जसा सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला तसाच राजीनामा रेल्वेचे ब्रिज बांधण्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्याकडून घ्यायला विसरू नका. त्यामुळे तुमचे गेलेले कुटुंबीय परत येणार नाहीत किंवा तुमच्या जखमाही भरणार नाहीत, एक निश्चित होईल ते म्हणजे अशी घटना पुढे घडणार नाही.....

आपला अफ्यास्पूर्ण लेख वाचला. आपली तळमळ लक्षात आली. सत्याची कास धरून पत्रकारितेची जबाबदारी पेलवत हे काही कमी नाही. स्वार्थी वृत्ती सोडा आणि दुसऱ्यांचा विचार करा हीच आपण सांगत असलेली विचारधारा मानवाला मानवापासून दूर नेत आहे. कारण स्वत: मध्ये मानव रमला आहे. जर प्रत्येक मानवाने ठरवले तर माणूस अधिक आनंदी राहू शकतो.
ReplyDelete